पंढरपूर शहरातील दुकाने अ,ब,क,ड पद्धतीने सुरु करण्याचे नियोजन पंढरपूर नगरपालिकेने केले आहे. मात्र यात व्यापाराची साखळी खंडीत होत असल्याने व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभुमीवर अनुषंगिक मंत्री मंडळ बैठकीतील चर्चा व निर्णय महत्वपूर्ण आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील शासन निर्णयानुसार सर्व आस्थापने सुरु ठेवण्याचे आवाहन पंढरपूर - मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदिप मांडवे यांनी दिली असून, सामाजिक अंतर ठेवून, विशिष्ट वेळेत, आरोग्याची काळजी घेत व्यापारी वर्गाने दुकाने चालू ठेवा़वीत.काही अडचणी आल्या तर माझ्याशी ९८२२०१४३९९ वर संपर्क साधावा असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा शहरात सर्व दुकाने,रिक्षा, टांगा, फेरीवाले, हातगाडे,केशकर्तनालये इ. आस्थापने दिनांक २२ मे पासून सर्व नियमांचे तंतोतंत पालन करुन सुरु होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सुचनेनुसार आमदार भारत भालके यांनी जाहिर केले असल्याचे सांगितले आहे .