देशाचे दुर्दैव दारुड्यांना संरक्षण देण्याची वेळ
मात्र शासनाचा हा निर्णय नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ऐकला नाही.तुकाराम मुंढेनी एक वेगळा आदेश काढून आम्ही शिथीलता देणार नसल्याचं स्पष्ट केलं.खरोखरच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. दारूची दुकाने उघडण्यास अनुमती मिळाल्याने दारूच्या दुकानाच्या प्रत्येक ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. देशातील कोरोनाचा प्रभाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू वाढत असतांना दारूच्या दुकानांबाहेरील ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळणे, मास्क लावणे, कलम १४४ नुसार चार जणांनी एकत्र न येणे, घरातच रहाणे आदी सर्व नियम पायदळी तुडवले जाणार आहेत. दारू पिण्यासाठी मद्यपिंची ही स्थिती पाहून दारू प्यायल्यानंतरच्या अवस्थेचा विचारच न करणे चांगले. शासन आगीत राँकेल ओतत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकीकडे जाहिराती दाखवायच्या तंबाखू गुटखा खाल्याने, सिगारेट ओढल्याने कॅन्सर होतो आणि दुसरीकडे खुलेआम त्यांना परवानगी देण्याचा आणि आताचा दारूला परवानगी देण्याचा प्रकार एकच आहे.तरी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कारवाई करत ही दुकाने बंद करण्यात यावीत. खरोखरच या देशातील नागरिकांचे दुर्दैव आहे की पोलिसांना या दारुड्यांना संरक्षण द्यावे लागत आहे. आत्तापर्यंत गुंडगिरी करणारे, दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात येत होतेे मात्र यावर कहर केला गेला आहे.